नमस्कार मंडळी!
कसे आहात सगळे? दिवाळीची चाहूल लागली असेल ना आता?
मुलांच्या परीक्षाही सुरू होत असतील! त्यांच्या अभ्यासाचं टेन्शन आपल्याला आणि ते मात्र सुट्टीचं प्लानिंग करत असतील मनात! आपण ही तेच करायचो ना?
आठवतंय का काही? जरा ताण देऊन बघा, नक्कीच आठवेल! किल्ला करायचा की नाही? घरचे नवीन कपडे घेणारेत की नाही? फटाके कितीचे घ्यायचेत? फिरायला जायचं आहे का? जाणार असल्यास कोठे? की आपल्या कडेच कोण येणार आहे?
माहीत तर काहीच नसायचं पण या गोष्टींचा किती विचार करायचो आपण!
त्यात परत दिवाळीचा अभ्यास! मी तर पहिल्या २-३ दिवसात संपवायचो! म्हणजे सुट्टी कशी सुटसुटीत जायची 😁
घरचे सगळे काही ना काही कामात असायचे आणि त्यांना मदत करायच्या निमित्ताने आपण त्यांची कामे वाढवून ठेवायचो, आपल्या फर्मयाशी पण सांगायचो!
आठवलं असेल ना? तर मग आपल्या मुलांनाही हे सगळं एन्जॉय करूद्यात....थोडा त्रास देउद्यात! अगदीच मोकळा हात आपण देत नाहींच पण मग एकदम कडक शिस्त पण नको!
दिवाळी येत आहे त्या बरोबर आपलं बालपण पण येईल आपल्या मुलांच्या रूपाने! चला तर मग दिवाळीच्या आणि आपल्या लहानपणाचं स्वागत करायची तयारी सुरू करूयात! ☺
-योगेश गोसावी*
True.....Kids bring back our childhood...And diwali is truly special.small sweet article
ReplyDeleteनक्कीच
ReplyDelete